पोलिस प्रशासन न्यूज.

नगर–बीड–परळी रेल्वे प्रकल्पाला गती; १७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पुढील टप्पा पूर्ण करण्याचे निर्देश


बीड | प्रतिनिधी

मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या बहुप्रतिक्षित नगर–बीड–परळी या २५६ किमीच्या रेल्वे प्रकल्पाचा आढावा आज बीड येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. आगामी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापर्यंत (१७ सप्टेंबर २०२६) प्रकल्पाचा पुढील टप्पा पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.

​आढावा बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, “हा प्रकल्प मराठवाड्याच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच जमीन अधिग्रहण व स्थानिक पातळीवरील अडथळे दूर करून कामाचा वेग वाढवावा.”

​लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

​या बैठकीस खासदार बजरंग सोनवणे, आमदार धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संदीप क्षिरसागर, विजयसिंह पंडीत, विक्रम काळे यांच्यासह पालक सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत उपस्थित होते. प्रशासकीय यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.

​बीड जिल्ह्याचा कायापालट होणार

​नगर–बीड–परळी मार्ग पूर्ण झाल्यानंतर बीड जिल्हा प्रथमच राज्याच्या मुख्य रेल्वे नेटवर्कशी थेट जोडला जाईल. यामुळे केवळ प्रवाशांची वाहतूक सुलभ होणार नाही, तर कृषी मालवाहतूक, उद्योग, व्यापार, पर्यटन आणि शिक्षणाच्या नवीन संधी उपलब्ध होतील.


84
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!